My Blog List

Monday, 16 November 2015

चातुर्वर्ण्य व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र सरकारने सफाई कामगारांच्या नियुक्तीमध्ये वारसा पद्धत कायम ठेवत तो अनुसूचित जातीतील सर्व जातींना लागू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो सकृतदर्शनी जाती व चातुर्वण्यव्यवस्था बळकट करण्यावरचा सरकारी ठप्पा असल्याचे दिसते. वाल्मिकी-मेहेतर समाजासकट इतर जातीना सामाजिक आणि आर्थिक संरक्षण देण्याच्या नावाखाली घेतलेला निर्णय हा धर्मशास्त्रीय सनातनी मानसिकतेचे द्योतक आहे.

४० वर्षापूर्वी लाड समितीने शिफारस केलेल्या वारसा पद्धतिचा तेव्हाच्या सरकारनेच विरोध करावयास पाहिजे होता. त्याने समाजातील विषमतेची दाहकता कमी झाली असती. परंतु तसे झाले नाही. याला सरकारमधील मंत्र्यांची श्रेष्ठ कनिष्ठ मानसिकताच जबाबदार असावी. परंतु आता फडणवीस सरकार त्याही पुढे जावून ही पध्दती कायम ठेवण्यासह वाल्मिकी-मेहतर या जातीसोबतच अनुसूचित जातीमधील इतरानाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. साफसफाईचे काम केवळ अनुसूचित जातीच्या समाज घटकानीच का करायचे? साफसफाईचे काम करण्यास इतर जातीवर्गांना प्रतिबंध करून ते काम जबरदस्तीने अनुसूचित जातीना करावयास लावणे हे भारतीय घटनेच्या सामाजिक समानता प्रस्थापित करण्याच्या तत्वाविरोधात आहे. उत्तर प्रदेशातील मायावती सरकारने साफ सफाई व अस्वच्छता या नोकरी क्षेत्रातील जागा ह्या सर्व वर्गासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.



साफसफाई कामगार पदासाठी विविध जाती समुहातून अर्ज मागविण्यात आले होते व त्यास सर्ववर्गीय समाजातून भरपूर अर्ज प्राप्त झाले होते. परंतु येथे (महाराष्ट्रात) तर सरकारच श्रम आधारित जातीव्यवस्था कायम ठेवण्यास उत्सुक सल्याचे दिसते. हे फार धोकादायक असून याचा विरोध होणे अत्यंत गरजेचे आहे. सरकार कोणाचेही असो त्यांनी नेहमी समाजिक सुधारणा व परिवर्तनाच्या भूमिकेत असले पाहिजे. परंतु हे सरकार सुधारणा करण्याऐवजी धर्म व चातुवर्ण्यव्यवस्था अधिक सुधृढ व बळकट कशी होईल याकामी लागलेले दिसते. अशा सरकारचा आदर कोणास वाटेल? मग या सरकारला सवर्ण व सनातनी लोकांचे सरकार म्हणावे काय?. भारतात जातीव्यवस्था ही श्रम विभागणीचे नाही तर ती श्रामिकाच्या विभागणीचे फळ आहे. डाक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे जातीव्यवस्था ही केवळ श्रमविभाजन अथवा श्रमिकाचे विभाजन नाही तर ती एक उतरंड आहे. यात मजुराचा एक वर्ग दुसऱ्या वर्गापेक्षा उच्च आहे.


दुसऱ्या कोणत्याही देशातील मजुरात श्रमासोबत श्रमिकाचे अशाप्रकारे उच्चनीच श्रेणीत विभाजन झालेले नाही. परंतु भारताच्या धर्मशास्त्रीय व्यवस्थेने ते केले आहे. २१ व्या शतकातही हे असेच चालू द्यायचे काय?. ज्या धार्मिक श्रध्दावर आजच्या मानसिकतेच्या गुढ्या उभारलेल्या आहेत त्या श्रद्धा नष्ट केल्याशिवाय दुषित मानसिकता नष्ट होणे शक्य नाही. सामाजिक गुणवत्ता ठरविण्याकरिता प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्तृत्वास वाव मिळाला पाहिजे. व ज्याला त्याला त्याच्या आवडीनिवडी नुसार कार्यक्षेत्र निवडता आले पाहिजे. या व्यवस्थेलाच जातीव्यवस्थेत हरताळ फासला गेला आहे. यात माणसाची निवड त्याच्या अंगभूत गुणांवरून करण्यात येत नाही तर त्याच्या पूर्वजांच्या व्यवसायावरून ठरविण्यात येते. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ या सिद्धांतावर ते आधारलेले आहे. जन्मजात लादलेल्या धंद्याची पध्दती ही संपूर्ण समाजास घातक आहे. जातिव्यवस्थेतील हे श्रमविभाजन हे ऐच्छिक नाही, व्यक्तीच्या भाव भावना व आवडी निवडी ह्यांना यात स्थान नसते.

भारतात असे अनेक धंदे आहेत जे जे कनिष्ठ प्रकारचे समजण्यात येतात. त्यामुळे त्या धंद्यातील लोकात आपापल्या धंद्याबाबात घृणा निर्माण होते. ते धंदे सोडण्याची प्रवृत्ती त्यांच्यात वाढीस लागते. किंबहुना तो समाजच असे काम करण्यास स्वत:हून मनाई करतो परंतु सरकारच जबरदस्तीने काम थोपवत जबरदस्ती करीत असेल तर राज्यघटनेच्या समानतेच्या तत्वाविरोधी ठरते आहे. त्यामुळे सामाजिक असमानता कायम ठेवू इच्छीनारा हा निर्णय सरकारने रदबादल करण्याची गरज आहे. अन्यथा अगोदरच सरकारवर पेशवेशाहीच्या आगमनाचे लांच्छन लागल्याचा जो आरोप आहे तो अधिक गढध होवून त्यास या निर्णयाने पुष्टी मिळाल्यासारखेच होईल.

Tuesday, 3 November 2015

‘होम मिनीस्टर’ रंगल्या पैठणीच्या खेळात

‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे ‘पैठणी’ ही महिलांचे आकर्षण ठरली आहे. या कार्यक्रमात आपला सहभाग असावा, असे प्रत्येक महिलांना वाटते. त्यासाठी त्या प्रतीक्षा देखील करत राहतात. लोढा हेवन परिसरातील प्रत्येक महिला व मुलींची ही इच्छा पुर्ण करण्यासाठी प्रत्येक सोसायट्यांमध्ये ‘होम मिनीस्टर’चा खेळ आयोजित करण्यात आला होता.
गेल्या १०-१२ वर्षांपासून होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रासह सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. खास महिला वर्गासाठी असणार्‍या या कार्यक्रमाद्वारे महिलांतील विविध कलागुणांना वाव देण्याचे काम होत आहे. होम मिनिस्टरला प्रतिसादही अमाप मिळत असून या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी महिलावर्गाला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. परंतू काही महिलांची या खेळामध्ये निवड होत नाही आणि मग त्यांची निराशा होते. निराश झालेल्या अशा महिलांच्या चेहर्‍यावर आनंद आणण्यासाठी लोढा हेवन परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये होम मिनिस्टरचा खेळ आयोजित करण्यात आला होता. सायं. ४ च्या सुमारास लोढा हेवन येथील चंद्रेश ओयासिसच्या सी आणि जी बिल्डींगच्या परिसरात सर्व महिला एकत्र जमल्या होत्या. कार्यक्रमाच्या पद्धतीनुसार खेळ व स्पर्धेचे विविध टप्पे पार पडले. यावेळी संगीत खुर्ची, लिंबु चमचा स्पर्धा अशा विविध स्पर्धा महिला व लहान मुलांसाठी घेण्यात आल्या. यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या पैठणीचा मान प्रमिला पवार हीने पटकाविला. तर दुसर्‍या क्रमांकाची पैठणी रिता तिवारी व तिसर्‍या क्रमांकाची पैठणी रोहिणी नेवासे यांना प्राप्त झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर गपाट यांनी केले असून उपस्थित सर्व महिलांचे मनोरंजन करून खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून केले होते.

Wednesday, 21 October 2015

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’

दुर्गा.. दुष्टांचे निर्दालन करणारे देवीचे एक रूप; पण आपल्या अवती भवतीही अशा अनेक दुर्गा आहेत. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातील कोणी अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने अत्याचारा विरोधात लढत आहे, कोणी कठोरपणे अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहे, कोणी अथक परिश्रमांनी समाज बदलवून दाखवत आहे, तर कोणी अबलांना सबला बनवीत आहेत. अशा दुगार्ंंंची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास असल्यानेच आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुगार्ंची माहिती समाजासमोर आणण्यासाठी ‘दै. धावते नवनगर’ ने
‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’ हा उपक्रम सुरू केला. 

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’
दुर्गा.. दुष्टांचे निर्दालन करणारे देवीचे एक रूप; पण आपल्या अवती भवतीही अशा अनेक दुर्गा आहेत. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातील कोणी अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने अत्याचारा विरोधात लढत आहे, कोणी कठोरपणे अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहे, कोणी अथक परिश्रमांनी समाज बदलवून दाखवत आहे, तर कोणी अबलांना सबला बनवीत आहेत. अशा दुगार्ंंंची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास असल्यानेच आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुगार्ंची माहिती समाजासमोर आणण्यासाठी ‘दै. धावते नवनगर’ ने ‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’ हा उपक्रम सुरू केला. नऊ संघर्षाच्या कहाण्यांपैकी दै. धावते नवनगरमध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या बायलाईन स्टोरी....

‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’


दुर्गा.. दुष्टांचे निर्दालन करणारे देवीचे एक रूप; पण आपल्या अवती भवतीही अशा अनेक दुर्गा आहेत. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातील कोणी अन्यायाच्या विरोधात उभी राहिली आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने अत्याचारा विरोधात लढत आहे, कोणी कठोरपणे अन्यायाच्या विरोधात संघर्ष करत आहे, कोणी अथक परिश्रमांनी समाज बदलवून दाखवत आहे, तर कोणी अबलांना सबला बनवीत आहेत. अशा दुगार्ंंंची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल हा विश्वास असल्यानेच आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुगार्ंची माहिती समाजासमोर आणण्यासाठी ‘दै. धावते नवनगर’ ने ‘सलाम नवदुर्गांच्या कर्तुत्वाला!’ हा उपक्रम सुरू केला. नऊ संघर्षाच्या कहाण्यांपैकी दै. धावते नवनगरमध्ये प्रकाशित झालेल्या माझ्या बायलाईन स्टोरी ..........

Wednesday, 26 August 2015

बंध धाग्यांचे पण अर्थ निराळे...

कॉलेजच्या तरुणांमध्ये गेल्या आठवड्यात उत्साह होता तो फ्रेंडशिप डेचा. अनेकांनी अगदी दोन दिवस हा फ्रेंडशिप डे अगदी जोमाने साजरा केला. फ्रेंडशिप बँड बांधून एक अतुट नातं निर्माण केलं जातं. तसंच रेशमी धाग्याची कोमलता घेऊन येणारं अजून एक नातं म्हणजे बहीण-भावाचं. एकीकडे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून फ्रेंडशिप डे साजरा केला गेला. तर त्यानंतर आठवड्याभराच्या फरकाने भारतीय संस्कृतीनुसार रक्षाबंधन साज
रं होईल. मैत्रीचं नातं काय किंवा बहीण-भावाचं नातं काय, दोन्ही नात्यांची जाणीव करून देण्यासाठी एकच रेशमी धागा बांधला जातो. या दोन्ही नात्यांचा अर्थ जरी वेगवेगळा असला तरी त्या दोन्ही नात्यात सच्चेपणा आणि विश्वास हा असतोच. अशा रेशमी धाग्यात अडकलेल्या नात्याविषयी.
सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर एक मेसेज फिरतोय, ‘लास्ट संडे फ्रेंडशिप डे, नेक्स्ट संडे राखी, इस संडे आप लडकी के पिछे, नेक्स्ट संडे लडकी आपके पिछे’. या मेसेजवरून सगळं काही कळतं. एखाद्या मुलीनं मैत्री करावी म्हणून तिच्या पाठीपाठी फिरणार्‍या मुलांसाठी हा मेसेज आहे.  ‘फ्रेंडशिप डे’ला तर व्हॉटस् ऍप, फेसबुक यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर तर शुभेच्छांना अगदी उतच आला होता. प्रत्येक जण आपल्या खास मित्राला किंवा मैत्रिणीला, एवढंच नाही तर अगदी तोंडओळख असणार्‍यांनासुद्धा मेसेज, इमेजेस टाकत होते. परंतु कॉलेजिअन्समध्ये फ्रेंडशिप डे असा रंगात आलेला असतानाच त्यांना ‘फ्रेंडशिप डे’नंतर एकाच आठवडयात येणार्‍या रक्षाबंधनाचंही टेन्शन आलं होतं.
अगदी मैत्रीसारखंच अतुट नातं म्हणजे रक्षाबंधन. बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याला उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करते. तर भाऊ तिला वचन देत म्हणतो की, ‘‘ मी सदैव तुझी रक्षा करेन. फ्रेंडशिप डे सारखंच यादिवशी देखील हाताला रेशमी धागा बांधून हे नातं अधिक घट्ट बनवलं जातं. पण फ्रेंडशिप डे साजरा करायला उत्सुक असणारी तरुणाई रक्षाबंधनाला तर कॉलेजमधून गायबच होते. सख्खे भाऊ-बहीण हा दिवस आवडीने साजरा करत असले तरी कॉलेजमध्ये जाताना मुलांच्या मनात भीति असते की एखाद्या मुलीने फ्रेंडशिप डेचा बँड बांधते असं सांगून मला राखी बांधली तर काय? मित्राऐवजी थेट मानलेला भाऊच बनवलं तर काय ? या धास्तीने बरेच तरूण दोन दिवस कॉलेजला बंकही करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी शक्यतो मुलींना टाळण्याकडेच कॉलेजमधील मुलांचा कल असतो. ‘तुच माझा सच्चा दोस्त’ असं सांगणारा तरुणवर्ग रक्षाबंधनाला आपल्या सख्ख्या बहिणीला सोडून कोणासमोर हात पुढे करतच नाही.
पण मुली देखील काही कमी नसतात. एका तरी मुलाला मला भाऊ बनवायचंच आहे, असा निश्चय त्यांनी केलेला असतो. मग अशा एखाद्या मुलाला भाऊ बनवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या त्या लढवतात. फ्रेंडशिप बँडसारखीच दिसणारी ट्रेन्डी राखी आणतात आणि ती राखी त्यांना बांधतात. एकदा का राखी हातात बांधली की त्यांना खरं सांगतात. मुलांच्या त्रासापासून स्वत:ला वाचवण्यासाठी मुली असे किंवा यांसारखे अनेक प्रकार करतात. पण यातले काही तरुण खूपच हुशार असल्यामुळे ते या दिवशी कॉलेज, क्लासच्या आजूबाजूलासुद्धा फिरकत नाहीत. फ्रेंडशिप डेच्या वेळी अंगात उत्साह संचारलेली मंडळी रक्षाबंधनाला कोण जाणे कुठे नाहीशी होतात ! तसं बघायला गेलं तर ही दोन्ही नाती अगदी अतुट आहेत. त्यात जितकं साम्य आहे त्याच्या कित्येकपटीने त्यात फरकही आहेत. भावांसाठी आणि बहिणींसाठी असणारं प्रेम आणि एखाद्या मित्रमैत्रीणीसाठी असणारं प्रेम यात बराच फरक आहे.
पण नातं कोणतही ही असो यात विश्वास, निरागसता, प्रेम, सच्चेपणा आहे आणि तो विसरून चालणार नाही. नातं कोणतंही असो ते टिकवणं महत्वाचं हाच संदेश हे रेशमी धागे देतात. म्हणून तर ही बंधनाची शपथ घातली जाते. पाश्चात्य संस्कृतीचा आपण अवलंब करत असलो तरी आपल्या भारतीय संस्कारांचा आणि विचारांचा तरुणांना विसर पडू नये हे मुलांनाही लक्षात ठेऊन वागावं. आजकाल, ‘मी तुझा मित्र आहे ना !’ असं सांगून कित्येक मुलं मुलींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. या जवळीकीची परिणीती कदाचित त्या मुलीला नकोशा घटनांमध्येही होऊ शकते किंवा तिला अती जवळीक नकोही असेल. पण हेच मित्राला सांगण्यासाठी तिला मग नाईलाजाने रक्षाबंधनाचा आधार घ्यावा लागतो. मैत्रीचं नातं जसं पाण्यासारखं स्वच्छ असावं, तसंच भावाबहिणीचं नातं ही असावं. 

Monday, 17 August 2015

श्रावणी सोमवार, शिव आणि आपण...

आज पहिला श्रावणी सोमवार...श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो... काही जण खास करून सोमवार पाळतात...पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...दै. धावते नवनगरमध्ये आज प्रकाशित झालेल्या माझ्या लेखामधून....