आज मी ऑफिसला येण्यासाठी घरून निघाली. दररोजच्या प्रमाणे १२. ३० ची बस पकडली आणि कानात हेडफोन टाकून मराठी अभिमान गीत ऐकत होती. तितक्यात मी खिडकीतून बाहेर एक उभी कार पहिली. मस्त चकाचक पांढरी होती. पण त्यावर लिहिलेल्या एका वाक्याने माझ लक्ष वेधलं. वाक्य होत 'भगवं वादळ'. तितक्यात मी अंदाज बांधला, कार मालक हा शिवसैनिक असणार. बस आणखी पुढे गेली. काही वेळाने मला एक सुमो दिसली. भरगच्च माणस भरलेली… त्यावर लिहिलेल्या 'नीळ वादळ' या वाक्याने माझ्या भुवया आणखी उंचावल्या… ऑफिस मध्ये येता येता मी विचार केला, वादळ हा निसर्ग शक्तीचा एक भाग आहे. आणि आपण माणसांनी या वादळाला देखील विविध धर्माच्या रंगानी रंगवून टाकले आहे. आपण मराठी भाषेचे, परंपरेचे अभिमनपर खूप गीते ऐकतो आणि त्याचा आपल्याला गर्व सुद्धा वाटतो. पण खरंच आपण फक्त महाराष्ट्रीय आहोत का? कि फक्त विशिष्ट समाजाचे आहोत असा मर्यादित विचार करतोय?
-https://www.facebook.com/pramila.pawar.37/posts/768114443274861?notif_t=like
-https://www.facebook.com/pramila.pawar.37/posts/768114443274861?notif_t=like