My Blog List

Sunday, 14 February 2016

जातीत गुंडाळलेले तरुणाईचे प्रेम....

मित्रानो..... आज व्हॅलेंटाईन डे.... यानिमित्ताने एक खरी खुरी प्रेम कहाणी.....नक्की वाचा......

एक मुलगी होती साधी सरळ....थोडीसी खट्याळ....नेहमी स्वप्नांच्या दुनियेत रंगलेली....आणि
एक मुलगा होता स्वाभिमानी हुशार नेहमी आपल्या माणसांचा विचार करणारा.... अशीच दोघांची एकदा ओळख झाली.....आणि त्यांची छान मैत्री झाली....
त्यातूनच त्याचं फोन call आणि sms चालू झाले.... ती मुलगी रोज त्या मुलाला फोन आणि sms करायची.... जर ती त्याला एक दिवस जरी फोन किंवा sms नाही केला तर तो तिच्यावर रागवायचा..... तिला विचारायचा ..... "का ग काल तू फोन नाही केला,मी वाट पाहत होतो तुझ्या फोनची ".
ती त्याला म्हणायची कि, " नाही sorry काल नाही जमल फोन करायला "....
तिच्या ह्या उत्तरावर तो समाधानी नसायचा....त्यातूनच तो तिला साधपण दाखवायचा... रोज त्यांचे फोन आणि sms चालू राहिले...त्या मुलीला त्याच्याशिवाय करमत नसे...तिने किती हि ठरवलं कि आपण त्याला जास्त sms नाही करायचं...
तरी हि त्याला sms केल्याशिवाय तिला
करमत नसे...
ती त्याला sms करायची......त्याचं बोलन वाढू लागल होत....ती एकटी असली कि त्याचाच विचारात गुंतायची...किती हि ठरवलं कि नाही त्याचा विचार करायचा तर हि .... ती अधिका - अधिक त्याच्यात गुंतत जात होती....कारण ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे तीच तिलाच कळल नाही...........
त्याच्या विचारात असताना त्याचे बोलण आठवून स्वतःशीच एकटी हसायची....गाण गुणगुणत बसायची.
" पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले "
आता तिला त्याची सवय झाली होती....सतत त्याच्याशी बोलावस वाटायचं... आणि तिला त्याच्यशी बोलल्याशिवाय राहवत नसे....त्याच्या
आवाजात ती आनंदी व्हायची....
हळू हळू ती त्याच मन हि ओळखू लागली होती.... त्याच मूड कसा आहे ?.. का आहे ?
ह्या गोष्टीचा त्याला आश्चर्य वाटत होते.
तो तिला विचारायचा..."अगं तुला कस कळल कि माझ मूड खराब आहे ते...?."
ती त्याला म्हणायची "मैत्री केली आहे....
थोड फार तरी कळू शकत ".. अशाने ती त्याच्यात आणखी गुंतू लागली...त्याच्याशिवाय तिच्या मनात कोणी नसे....
त्या दोघांची एक वेगळीच दुनिया होती आणि अखेर या प्रेमाला लग्नात रुपांतर करण्याचा विचार करण्याची योग्य वेळ आली. त्याने लग्नांतरच्या सर्व जबाबदार्या पेलण्याची तयारी केली होती. चांगला जॉब मिळविला एक्स्ट्रा सेविंग जमा केली होती. जर हे सगळ केल नसत तर तिच्या घरच्यानी तिचा हात त्याच्या हातात नसता दिला ना... ती ही शिक्षण पुर्ण करुन तिचे करियर सुरु केले होते. तीने तिच्या आयुष्यात खुप पुढे जावे अशी त्याची इछा असते. आणि ती ही त्याच्यासाठी करियर घडवु लागते. ती जातीने महार आणि तो जातीने चांभार... तिच्या घरात देव ही संकल्पनाच नव्हती तर त्याच्या घरात काही गुड न्युज आली तर ते देवाच्या कृपेने च मानले जात. घरी सांगयच कस की जो मुलगा मला आवडतो तो चांभार जातीचा आहे... आणि तो कस सांगणार की त्याला जी मुलगी आवडते ती आपल्या जातीबाहेरची आहे. तिला ही तिच्या घरच्याना दुखवायचे नसते आणि त्यालाही.... पण ते एकमेकांशिवाय ही राहु शकत नव्हते. त्यांचा या अडचणीत आणखी एका अडचणीला सामोरे जावे लागते. अचानक तो त्याच्या गावी शिफ्ट होतो. तिला सांगितल तर ति पुर्णपणे तुटुन जाईल या विचाराने तिला काहीच न सांगता तो गावी निघुन जातो. मन मात्र तिच्या विचारानेच चिंतेत असते.
दुसर्या दिवशी ती त्याला दररोजच्या प्रमाणे कॉल करते... पहिला कॉल उचलला जात नाही. कामात असेल असा विचार करुन ती काही वेळाने कॉल करते. पण तेव्हाही कॉल उचलला जात नाही. थोडी निराश होत रात्रीची वाट पाहते. रात्री कॉल केल्यानंतर देखील कॉल उचलला जात नाही. यावेळी मात्र तीची चल विचल होते. तिच्या मनात अनेक प्रश्न घर करुन बसलेले असतात. तिचा कॉल उचलल्या नंतर आपण गावी कायमचे रहायला आलो आहोत.. आता आपल्याला पहिल्यासारख भेटता येणार नाही हे सांगता येणार नाही म्हणुन त्याने तिचे कॉलही उचलले नव्हते. त्यालाही बरच काही बोलायच असत... पण कस? पुढे ती अनेक महिने त्याला लागोपाठ कॉल करत राहिली. पण एकही कॉल उचलला नाही. काय झालय हे ही तिला कळेना. मग ती तिच्या मित्राना फोनाफोनी करुन विचारपुस करु लागते. मग तिला कळत की तो तर अनेक महिन्यापुर्वीच गावी शिफ्ट झाला.
हे ऐकुन पायाखालची जमीनच सरकते ती स्तब्ध होते.....
एका आडोश्याला होताना तिच्या पायात काच रुतली... पायातून रक्त वाहत होत तिला माहितच पडल नाही... ती तशी स्तब्ध बसत.. तेवढ्यात तिचे frnds आणि आई शोधात येतात... तिच्या पायाला पाहून तिची आई ओरडते "अग पायात काच गेली आहे आणि तुझ लक्ष कुठेय?
"आई मग पायातून काच काढते
पण तीच हृदय त्या काचे प्रमाणेच तुटल होत. तशीच जाऊन ती समुद्रात बसते. कोणाला डोळ्यातले अश्रू दिसू नये म्हणून त्या पाण्यात भिजून आपले अश्रू लपविते
त्या रात्री तिला झोप लागली नाही...
नंतर एक वर्षानंतर एके  दिवशी ती त्याला call करते ...एक वर्षानी तिचा आलेला फोन पाहुन आता त्यालाही रहावत नाही. डोळ्यातले अश्रू गिळून ती त्याला बोलते....कसा आहेस? कारण तिलाही माहीत होत इतके वर्ष लांब राहुन तो ही एकटा पडलेला असणार. इतक्या वर्षाच्या दुराव्या नंतरही चेहर्यावरचे हाव भाव न पाहताही ते एकमेकांचे मन ओळखु शकत होते. तिचा प्रश्न ऐकुन त्याचे ही डोळे पाणावले होते. परंतु ते तिला कळु द्यायच नव्हत. तो म्हणाला, ठीक आहे. आणि पुढचे काही मिनिटांचा संवाद हा काही एक शब्द न बोलता हार्ट टु हार्ट कम्युनिकेशन होते. काय तक्रार करावी ते तिला कळत नव्हत.... काय बाजु मांडावी हे त्याला कळत नव्हत... परंतु दोघानाही सगळ काही न बोलताच समजल होत. ती म्हणाली, आपण आपली मैत्री तर ठेउ शकतो ना? त्याच्याकडे उत्तर नव्हत. तो म्हणाला जात खुप वाईट आहे ग. हा समाज आपल्याला एकत्र नाही राहु देणार. योगा योगाने त्या दोघांच गाव ही एकच होत. आपल्या घरचे नाही करु देणार आपल्याला लग्न...तो ही हरला होता समाजापुढे.... तिनेही याचा स्विकार केला. परंतु मैत्री मात्र त्यानी कधी मरु दिली नाही. त्यानंतर ते दोघे आपआपल्या आयुष्यात रमु लागले. आणि एक दिवस असा आला की दोघांच्या पायाखालची जमिनच सरकली. तिचे हॉस्पिटलमध्ये फेऱ्या सुरु झाल्या. तिला अनेक महिन्यापासुन ताप येत होता. परंतु तिने साधा ताप समजुन दुर्लक्ष केल होत. आणि तापाचे प्रमाण वाढु लागल्याने डॉक्टरकडे उपचारासाठीगेली. डॉक्टरानी तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे सांगितले होते. ती त्याच्या दुराव्याने आधीच तुटलेली होती. पण त्यानंतर ती मनाने आणखीच खचली होती. हे त्याला कळाले आणि त्याच्या ओठातुन शब्दच फुटत नव्हते. आता तिचे त्याला जाणारे कॉल कमी झाले होते आणि हॉस्पिटलच्या फेर्यावर फेर्या वाढु लागल्या. तिला तिच्या या संघर्षात त्याची साथ हवी होती. परंतु बहुतेक गेल्या अनेक वर्षांचा दुरावा झळकु लागला होता. तो त्याच्या आयुष्यात आता इतका बिझी झालेला असतो की तिच ऑपरेशन कधी आहे हे जाणुन घेण्याची देखील उत्सुकता राहीलेली नसते. तिच ऑपरेशन यशस्वी होउन ती आजारातुन बाहेर पडलेली असते. अनेक महिन्यानी ति त्याला कॉल करते आणि पुन्हा प्रश्न विचारते, कसा आहेस? त्याच उत्तर मिळत, तु कशी आहेस? ति म्हणाली, मी ठीक आहे. तो बोलायला लागतो...... अडखळत अडखळत म्हणतो.... तुझ्या उपचारादरम्यान जर मी तुझ्या सोबत असतो तर पुढे कायम माझी साथ लागली असती. ती म्हणाली, तुझे हे स्पष्टीकरण नसते दिले तरी मला ते कळाले असते. दोघानच्याही या अबोल प्रेमामध्ये जात नावाची भिंत येत होती. अखेर या दोघानी समाज आणि घरच्यांचा विरोधासमोर हार मानली .दोघेही आपआपल्या आयुष्यात व्यस्त होउन एकमेकाना विसरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आंतरजातीय लग्नच कशाला, प्रेमविवाह असा शब्द जरी उच्चारला तरी अजूनही आपल्याकडे अनेक घरात वादळ घोंघावायलाच लागतं. शिक्षण-नोकरीच्या निमित्तानं तरुण मुलंमुली एकत्र येतात. त्यांच्या आवडीनिवडी जुळतात, विचार जुळतात आणि मग ते प्रेमात पडतात किंवा लग्न करण्याचा निर्णय तरी घेतात. आपण एकमेकांना अनुरूप आहोत, परस्परांसोबत आयुष्य जगायला आवडेल असं जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा परस्परांची जात-धर्म हे मुद्दे त्यांच्यादृष्टीनं गौण ठरतात किंवा हे मुद्दे त्यावेळी त्यांच्या मनातही येत नाही.
आपला निर्णय घरी सांगायचा असं जेव्हा ते ठरवतात, तेव्हा खरे प्रश्न निर्माण होतात. अनेकदा तर घरचे मुलांचं म्हणणं, निर्णय, भावनिक अवस्था हे सारं शांतपणे ऐकूनही घेतात आणि मग त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारत, ‘जात कोणती?’ या जातीच्या विळख्यात गुंडाळल्याने आजच्या तरुणाईला आपले प्रेम मिळत नाही. आज इंजिनियर, डॉक्टर, आर्टीस्ट, टेक्नीशीयन आदि व्यवसाय स्विकारणारे तरुण जातीमधुन बाहेर कधी पडणार? 

1 comment:

Akshay waghchaure said...

खुप छान मांडणी केली आहे.मुळात जात हा प्रकार जेव्हा समाजातून नष्ट होईल तेंव्हा च सर्व समाज एकत्र होईल.
खूप सारे ब्लॉग आहेत तुमचे बरेच वाचले मी.
अप्रतिम लिखाण आहे.