मित्र- मैत्रीणीनो.... तुमच्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छामुळे आज माझ्या नविन प्रोजेक्टच्या कार्याच्या शुभारंभाचा नारळ फुटला... आणि हे प्रोजेक्ट यशस्वी करायचेच हा निर्धारही मी मनाशी पक्का केलाय. याच प्रोजेक्ट संदर्भात आज एक मिटींग करण्यासाठी सकाळी सकाळी मोठ्या आत्मविश्वासाने घराबाहेर पडले.......
आमच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन जात असताना अचानक मी जात असलेल्या रस्त्याहूनच एक काळी मांजर आडवी गेली... काळी मांजर आडवी जाते न जाते तोच माझे पाउल देखील मांजरीने कापलेल्या रस्त्याच्या पुढे निघून गेले .. माझ्या मनात आलं.... माझ्या मागेही भरपूर जण होते... काय मी त्या ठिकाणी थांबवून अगोदर त्यांना पूढे जाऊ द्यायला पाहिजे होतं...! खरंतर तितका वेळ कुणाजवळ होता...!! मीटिंग होती सकाळी १० वाजता आणि मला अर्ध्या तासात त्या ठिकाणी पोहोचायचे होते. मीटिंगची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती... मीटिंगच्या वेळेचा माझ्या मनगटी घड्याळातच काऊंटडाऊन (उलटी गणती) सुरू झालेली होती... आणि माझ्या डोक्यात एक भलताच विचार भ्रमण करू लागला... आणि तो स्वाभाविकही होता... काय हा अपशकून समजायचा? काय आता माझी महत्वाची मीटिंग अटेंड करायला नाही जमणार का... .!!!
अगदी बालवयापासून आपल्या घरातूनच आपल्यावर काही बरे-वाईट संस्कार केलेले असतात... आणि त्यातलंच एक म्हणजे--> जर आपल्या रस्त्याने मांजर आडवी गेली तर तिथेच थांबून आधी दुस-या कुणालातरी तिथून पुढे जाऊ द्यायचं आणि मगच स्वत: त्या रस्त्याने जायचं... पण का? तर अपशकून होतं... आणि मग आपल्याआधी कुणी गेलं तर त्याला?? त्याला काही नाही होत... कारण त्याने मांजरीला पाहिलेलं नसतं... आणि या मांजरीला रस्ता ओलांडताना तर मीच चक्क पाहिलेल होतं... किंबहुना सर्वात पुढे मी असल्याने तीने माझाच रस्ता ओलांडला होता... मग हा अपशकून समजायचा का???
तर पहिली गोष्ट मी तर असल्या समजूतीना मानतच नाही व अंधश्रद्धांवर विश्वासही ठेवत नाही.... तरी काही ना काही प्रमाणात बालवयातच ठसलेल्या असल्या काही गैरसमजूतींचा थोडाफार का होईना पण प्रभाव माझ्या मस्तिष्कावरही होताच... पण मग या मांजरीचा विचार सोडून जे होईल ते पाहू असा विचार करून हा किस्साच विसरले.... आणि एकदाची माझी मीटिंग सुरू झाली....
मिटिंग सुरू होण्यापूर्वीही माझ्या दृष्टीने एक चांगलीच बाब घडली.. ज्यांच्या सोबत मिटिंग होती ते स्वभावाने खुप चांगले आणि समजुतदार होते. आणि मुळात त्याना देखील ऑफीसला येण्यासाठी उशीर झाला होता. मी त्यांच्या अगोदर येउन पोहोचली. आता आपल्या माहितीसाठी सांगते कि आजची मिटिंग बिघडण्याऐवजी उलट यशस्वी झाली. शिवाय मिटिंग संपल्यानंतर त्यांच्या ऑफीस वरुन परत येताना देखील कोणतीच अनपेक्षित घटना घडली नाही... आणि घडली असती तरी तिचा संबंध त्या मांजरीच्या रस्ता ओलांडण्याशी लावता आला नसता...
आता मला एकच गोष्ट विचाराविसी वाटते कि-- शुभकार्यास जात असताना कुणाची प्रेतयात्रा मिळाल्यास अथवा मांजर आडवी गेल्यास अशुभ मानलं जातं... मांजर रस्ता ओलांडणार नाही तर कशाने जाणार..? आणि शहरांमध्ये पाळलेली व खेड्यांमध्ये राहणारी मांजर घरातील सदस्यांपुढून कित्येक वेळा जाते तर अपशकून होत नाही. किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीकडून जाणा-या रस्त्याने प्रवास केल्यास प्रेतयात्रा वा अंत्यसंस्कार दिसणार नाही तर ते कुठे जाणार?? मग सत्कर्मी जाताना मांजर आडवी गेल्यास वा प्रेतयात्रा दिसल्यास अपशकून होणं कसं काय शक्य आहे? आणि जर एखादी अनुचित घडना घडलीच तर त्याचा एकच अर्थ म्हणजे तो केवळ एक योगायोग आहे... कारण यावरून एकच गोष्ट निष्पन्न होते ती म्हणजे मांजर व प्रेतयात्रेमुळे अपशकून होत नसून हा केवळ मानवाच्या मन व मस्तिष्कात बालपणापासून भरण्यात आलेला भ्रम व यावर विश्वास म्हणजे केवळ अंधश्रद्धा आहे
आमच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातुन जात असताना अचानक मी जात असलेल्या रस्त्याहूनच एक काळी मांजर आडवी गेली... काळी मांजर आडवी जाते न जाते तोच माझे पाउल देखील मांजरीने कापलेल्या रस्त्याच्या पुढे निघून गेले .. माझ्या मनात आलं.... माझ्या मागेही भरपूर जण होते... काय मी त्या ठिकाणी थांबवून अगोदर त्यांना पूढे जाऊ द्यायला पाहिजे होतं...! खरंतर तितका वेळ कुणाजवळ होता...!! मीटिंग होती सकाळी १० वाजता आणि मला अर्ध्या तासात त्या ठिकाणी पोहोचायचे होते. मीटिंगची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली होती... मीटिंगच्या वेळेचा माझ्या मनगटी घड्याळातच काऊंटडाऊन (उलटी गणती) सुरू झालेली होती... आणि माझ्या डोक्यात एक भलताच विचार भ्रमण करू लागला... आणि तो स्वाभाविकही होता... काय हा अपशकून समजायचा? काय आता माझी महत्वाची मीटिंग अटेंड करायला नाही जमणार का... .!!!
अगदी बालवयापासून आपल्या घरातूनच आपल्यावर काही बरे-वाईट संस्कार केलेले असतात... आणि त्यातलंच एक म्हणजे--> जर आपल्या रस्त्याने मांजर आडवी गेली तर तिथेच थांबून आधी दुस-या कुणालातरी तिथून पुढे जाऊ द्यायचं आणि मगच स्वत: त्या रस्त्याने जायचं... पण का? तर अपशकून होतं... आणि मग आपल्याआधी कुणी गेलं तर त्याला?? त्याला काही नाही होत... कारण त्याने मांजरीला पाहिलेलं नसतं... आणि या मांजरीला रस्ता ओलांडताना तर मीच चक्क पाहिलेल होतं... किंबहुना सर्वात पुढे मी असल्याने तीने माझाच रस्ता ओलांडला होता... मग हा अपशकून समजायचा का???
तर पहिली गोष्ट मी तर असल्या समजूतीना मानतच नाही व अंधश्रद्धांवर विश्वासही ठेवत नाही.... तरी काही ना काही प्रमाणात बालवयातच ठसलेल्या असल्या काही गैरसमजूतींचा थोडाफार का होईना पण प्रभाव माझ्या मस्तिष्कावरही होताच... पण मग या मांजरीचा विचार सोडून जे होईल ते पाहू असा विचार करून हा किस्साच विसरले.... आणि एकदाची माझी मीटिंग सुरू झाली....
मिटिंग सुरू होण्यापूर्वीही माझ्या दृष्टीने एक चांगलीच बाब घडली.. ज्यांच्या सोबत मिटिंग होती ते स्वभावाने खुप चांगले आणि समजुतदार होते. आणि मुळात त्याना देखील ऑफीसला येण्यासाठी उशीर झाला होता. मी त्यांच्या अगोदर येउन पोहोचली. आता आपल्या माहितीसाठी सांगते कि आजची मिटिंग बिघडण्याऐवजी उलट यशस्वी झाली. शिवाय मिटिंग संपल्यानंतर त्यांच्या ऑफीस वरुन परत येताना देखील कोणतीच अनपेक्षित घटना घडली नाही... आणि घडली असती तरी तिचा संबंध त्या मांजरीच्या रस्ता ओलांडण्याशी लावता आला नसता...
आता मला एकच गोष्ट विचाराविसी वाटते कि-- शुभकार्यास जात असताना कुणाची प्रेतयात्रा मिळाल्यास अथवा मांजर आडवी गेल्यास अशुभ मानलं जातं... मांजर रस्ता ओलांडणार नाही तर कशाने जाणार..? आणि शहरांमध्ये पाळलेली व खेड्यांमध्ये राहणारी मांजर घरातील सदस्यांपुढून कित्येक वेळा जाते तर अपशकून होत नाही. किंवा कुणाचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीकडून जाणा-या रस्त्याने प्रवास केल्यास प्रेतयात्रा वा अंत्यसंस्कार दिसणार नाही तर ते कुठे जाणार?? मग सत्कर्मी जाताना मांजर आडवी गेल्यास वा प्रेतयात्रा दिसल्यास अपशकून होणं कसं काय शक्य आहे? आणि जर एखादी अनुचित घडना घडलीच तर त्याचा एकच अर्थ म्हणजे तो केवळ एक योगायोग आहे... कारण यावरून एकच गोष्ट निष्पन्न होते ती म्हणजे मांजर व प्रेतयात्रेमुळे अपशकून होत नसून हा केवळ मानवाच्या मन व मस्तिष्कात बालपणापासून भरण्यात आलेला भ्रम व यावर विश्वास म्हणजे केवळ अंधश्रद्धा आहे
No comments:
Post a Comment